Posts

सावित्रीबाईं फुले

 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या. पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या. सावित्रीबाईंनी ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तारेने बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, "आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवूया." त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं. अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करू

उस्ताद लहुजी साळवे

लहुजी राघोजी साळवे :  (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१). एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरा

स्वप्नातला राजा

एकदा तुझ्या स्वप्नातला राजा होऊन दाखवेल. तुझ्या सहवासाचा क्षणकक्षण फक्त तुझ्या साठी वेचिल. एकदा तुझ्या स्वप्नातला  राजा होऊन दाखवेल. तुझ्या डोळ्यात पाहून माझे मला शोधील. एकदा तुझ्या स्वप्नातला राजा होऊन दाखवेल. - दत्तात्रय राऊत

नटसम्राट काळाच्या पडद्याआड

Image
नटसम्राट काळाच्या पडद्याआड डॉक्टर  तसेच ज्येष्ठ कलाकार श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ही बातमी ऐकून धक्काच बसला. कला क्षेत्रात अव्वल भूमिका बजावणारे. पिंजरा या मराठी चित्रपटातून समाजाचे दर्शन जागा समोर ठेवणारे व्यक्तिमत्व आज हरपले.  शांत संयमी आणि आभ्यासू व्यक्तिमत्व असणारे कलाकार म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. वाचन आणि लिखाण या गोष्टी च आचुक संगम यांच्या मध्ये दिसतो.. आज या घडीला एक प्रसंग मला आवरजून सांगावासा वाटतो.. साधारण पणे २०१७ मध्ये काही कंपनीच्या कामानिमित्त कोथरुड येथील एका खाजगी संस्थे मध्ये जाणाच्या योग आला होता. मी माझे काम आवरून सायकाळी ५ वाजता काम उरकून वापस घराकडे निघालो.  संस्थे च्या सभोवताली सुशोभित बगीचा आहे. या बागेत नित्य नियमाने श्रीराम सर वॉक करत असत. माझी नजर त्यांच्या वर गेली मला मोह आवरला नाही.. मी त्यांना वेळ मागितला. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता "हो बोला " असे उदगार दिले आणि जवळ असलेल्या कट्टा कडे बोट करून आपण तिथे बसू  आणि  बोलायला सुरुवात झाली.. सर्वप्रथम मी माझी ओळख करून दिली. माझे काम कंपनी आणि इतर गोष्टी विचा

Make own way

Image

इंसानियत

Image
इंसानियत

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही...

Image
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही....